राज ठाकरेंवर राज द्रोहाचा गुन्हा दाखल होणार का? का हा नियम फक्त राणा दाम्पत्यालाच लागू होतो?


महाविकास आघाडी सरकारचा दुटप्पीपणा, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून राणा दाम्पत्याला कलम 124 (अ) राज द्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक तर राज ठाकरे यांच्यावर कलम 153  गुन्ह्यांची नोंद म्हणजे राज ठाकरे यांना पोलीस ठाण्यात देखील जामीन मिळणार 
राज्यात दोन धर्मात तेढ निर्माण करून राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा, कायदा व्यवस्था कमजोर करण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच थेट मुख्यमंत्र्यांना म्हणजे  सरकार का आव्हान दिल्याचा ठपका ठेवत राणा दाम्पत्यावर कलम 124 (अ ) लावून राज द्रोहच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. मग मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर महाविकास आघाडीचं सरकार राज द्रोहाचा गुन्ह्याखाली अटक करणार का?.

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मस्जितीवरील भोंगे काढून टाकण्याबाबत भाषण केलं होत. त्यानंतर ठाण्यातील सभेत 3 मे पर्यंत मस्जितीवरील भोंगे काढून टाकण्याचा अल्टीमेटम राज्य सरकारला दिला. त्याच पार्शवभूमीवर औरंगाबाद येथे जाहीर सभा घेण्याचे राज ठाकरे यांनी सांगितले होते. राज ठाकरे हे दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करत असल्याच्या कारणावरून अनेक सामाजिक व राजकीय पक्ष संघटनांनी राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेला विरोध दर्शवला होता.

धार्मिक तेढ निर्माण होणार आणि त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडणार अशा प्रकारचे भडकावू अथवा चीथावनी खोर भाषण करू नये यासाठी 16 आटी घालून  पोलीस प्रशासनाने  घालून सभेला परवानगी दिली होती. मात्र सभेमध्ये पोलिसांनी घालून दिलेल्या कोणत्याच आटिंचे पालन करण्यात आले नाही. उलट 4 मे नंतर मस्जिवरील भोंजे सरकारने काढले नाही तर आम्ही ते भोंगे काढू असा ईशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यात धार्मिक दंगली करण्याचा आणि राज्याची कायदा व्यवस्था कमजोर करून राज्य सरकार अस्थिर करण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न आहे.
राज ठाकरे यांना राज द्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक होणार का?
ज्या कायदा व्यवस्थेच्या कारणास्तव खा.नवनीत राणा आमदार रवी राणा यांना राज्य सरकारने राज द्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करून तुरुंगात टाकले आहे.जर देशातील कायदा सर्वांसाठी सारखाच आहे.तर मग राज ठाकरे यांना राज द्रोहाच्या गुन्ह्याखाली का अटक केली जाऊ शकत नाही. राज ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बंधू असल्यामुळे त्यांच्यावर "राज" द्रोहाचा गुन्हा दाखल करणार का? किंवा त्यांच्यावर थातूर मातुर गुन्हे नोंद करून प्रतिबंधात्मक कार्यवाही करणार हे येत्या काही तासात राज्यातील आणि देशातील जनतेला कळेलच.
                                           
                                                    संपादकीय....



Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng